पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या पण सगळ्यात जास्त फुटेज खाल्लं ते पंजाबच्या निवडणुकीनं. एकूण १७७...
आरोग्य
रशिया आणि युक्रेन यांच्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा जोर वाढतच जात आहे. या युद्धात...
‘धमाल’ मधला “मानव” म्हणजेच “जावेद जाफरी” आठवतो का ? ‘धमाल’ बघितला असेल तर कोण विसरणार...
भारत सरकारची सर्वात मोठी कंपनी एलआयसी ( LIC) पुढच्या महिन्यात स्टॉक मार्केट मध्ये तिचा आयपीओ...
नुकताच वॅलेंटाईन डे झाला पण वॅलेंटाईन डे असला काय अन नसला काय प्रेम करणारे थांबतात...
आम्ही कॉलेज मध्ये असताना जेव्हा केव्हा निवडणुका लागायच्या आमचा पूर्ण दिवस पेपर वाचण्यातचं जायचा. क्लास...
आजोबा वारले म्हणून गावी गेलो होतो. आजोबांचं वय झालं होत. त्यामुळे आजोबाच्या जाण्याचं काही वाटलं...
२००४ ला भारत सरकारने ठराविक भाषांना क्लासिकल लँगवेज म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सुरु केले....
प्रत्येक जणांच्या आयुष्यात एक गुरु नक्की असतो.गुरु नसेल तर आपला आदर्श तरी असतोच असतोच.कोणाचा आदर्श...
आता अजून एक,शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्यातील उदिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता हे एक उद्दिष्ट आहे. कारण प्राचीन काळापासून स्त्रिया कायमच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कायम होरपळत आहेत. इतिहासापासून कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान स्त्रियांना आजही समान अधिकार असल्याचे दिसत नाही.कारण एकविसाव्या शतकात ही 87.09% कुटुंब प्रमुख पुरुष आहेत आणि 12.88% स्त्री प्रमुख घरे आहेत. ज्याचा परिणाम अनेक बाबींतून पुढे येतात, ज्यामध्ये स्त्रियांविरुद्ध वाढता हिंसाचार हे स्त्रिया असमान, असल्याचं पाहिलं लक्षण आहे. विशेषतः वाढत्या घरेलु हिंसचाराचे प्रमाण. 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या हिंसेमध्ये पती पत्नीच्या संबंधमधल्या हिंसेचे प्रमाणही बरेच मोठे आहे. परंतु अशा घटनांची नोंद खूप कमी प्रमाणावर होते आणि त्याला जबाबदार म्हणजे असक्षम स्त्री जिला समाजाने नेहमी कमजोर समजून मागे राहण्यास भाग पाडले. मागील टाळेबंदी च्या काळात तर घरेलु हिंसाचारमध्ये महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांमध्ये लागतो. स्त्री पुरुष असमानता फक्त आहे त्या पिढीला त्रासदायक आहे एवढेच नाही तर पुढच्या पिढीतील मुलामुलींना घरातील असमनातेला सामोरे जावे लागते. ज्याचा परिणाम घरातील स्त्री, मुलगी पुरूषी मानसिकतेला बळी पडून ती सक्षमते पासून कोसो दूर राहते. ही झाली सामाजिक असमानता.पण अशीच असमनता आर्थिक बाबिंतही पाहायला मिळते जसे की पुरुष कामगारांना महिला कामगारांपेक्षा त्याच कामासाठी 25% जास्त मोबदला मिळतो.जर ही परिस्थिती अशीच राहिली तर स्त्रिया कायम आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक रित्या दुर्बल राहतील. त्यामुळे अशा संरचनात्मक असमानतेचा प्रामुख्याने विचार करणे आणि त्यात अग्रणी बदल घडवणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही वाईट परिस्थितीत स्त्रियाना पुरुषांपेक्षा जास्त सहन करावे लागते.