महात्मा गांधी म्हणायचे विचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही . तुम्ही आता म्हणाल , राजकारणात कोणाला विचार आणि विचारधारा असते ? आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत हे सर्रास चालत कि. तर तुमचं खरंय. आजच्या राजकारणाकडे थोडं बारकाव्याने बघितलं कि असच दिसत. पैसे कमावणे हा एकमेव विचार शिल्लक राहिल्याचं वाटून जात. पण थांबा तुमचं लाल बावट्यावाले कार्यकर्त्यांबद्दल वाचायचं राहील आहे . आता हे लाल बावट्यावाले कोण तर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते . जे एकमेकांना कॉम्रेड म्हणतात . कॉम्रेडला शुद्ध मराठीत आपण सहकारी म्हणू शकतो .पण कॉम्रेड मध्ये जी क्रांती आहे,जो जोश आहे तो सहकारी शब्दात कुठे . त्यामुळे ते एकमेकांना कॉम्रेड अशीच हाक मारतात . तर असो कार्ल मार्क्सचे समाजवादी विचार घेऊन राज्य करायचं हे त्यांचं ध्येय . लेनिनने ती क्रांती रशियामध्ये करून दाखवली. पण इतर ठिकाणी जमली नाही . इतर ठिकाणी क्रांती यशस्वी झाली नसली तरी आम्ही ती एक दिवस नक्की करून दाखवू असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे क्रांती करायची असेल तर क्रांतीला पूरक वागावे लागेल, जनतेची कामे करावी लागतील ,सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल ह्यावर सर्व कॉम्रेडच एकमत आहे . सरकार आपल्या संघर्षची धार कमी करण्यासाठी आपल्याला कधी कधी पुरस्कार सुद्धा देऊ शकत त्यामुळे कॉम्रेड्सनी सरकारी पुरस्कार स्वीकारायचे नाही असा एक अलिखित नियम केला आहे. त्यामुळे कुठलाही कॉम्रेड सरकारी पुरस्कार स्वीकारत नाहीत.बुद्धदेब भट्टाचर्यांनी पण त्याच नियमाचे पालन करून पद्मभूषण नाकारला आहे. बाकी पक्षातले लोक कितीही पार्ट्या बदलू द्या पण लालबावट्यावाले विचार आणि विचारधारा सोडत नाहीत हे बुद्धदेब भट्टाचार्यानी दाखवून दिलय.
खास किस्से
दहा बारा खोलीची सातवी पर्यंतची शाळा आमची,से दोनशे पोर पोरी असतील सगळे मिळून.काही आमच्या गावातले तर उरलेले आजू बाजूच्या खेड्या पाड्यातले.ज्यांच्या कडे सायकली होत्या ते सायकलीवर यायचे तर बाकी पोर पोरी दोन तीन किलोमीटर पायी यायचे.शाळा दहा वाजता भरायची पण आम्ही सगळे घरून आठ, साडे आठलाच निघायचो.मस्त पैकी टवाळक्या करत कसे बसे शाळेत दहा पर्यंत पोहचायचो.रोज बर्याच जणांना उशीर व्हायचा. गुरुजीपण काय बोलायचे नाही हा कधी कधी पट्टीने मारायचे .गावातले पोर आम्ही काय फरक पडायचा नाही आम्हाला. पण आम्ही सगळे चिमुकले २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला मात्र आमच्या प्रिय झेंड्याच्या दिवशी सकाळी सातला शाळेत हजर असायचो.सगळे पोर पोरी टाप टीप असायचो ,सर मॅडमची नियोजनाची गरबड चालू असायची, वातावरण कस एकदम सात्विक असायचं,देशप्रेमाने मन उभारून गेलेले असायचे. झेंड्याच्या दिवशीच्या आठवणी आज देखील रोमांच उभा करतात.
“माझं पाकीट रूमवर राहिलंय तेवढं नाश्त्याचे बिल दे. रूमवर गेलो कि लगेच देतो” एखादा भुरटा...
महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला आज आत्मविश्वासाने वावरतात पण यासाठी सुरवातीच्या अनेक महिलांना खूप...
सुरुवातीच्या काळात संघटनेमध्ये काम केल्यावर समाजवादी पक्षाने त्यांना संसदीय राजकारणात आणले.१९७० च्या महाराष्ट्र विधानपरिषेद निवडणुकीत मधू दंडवते आमदार झाले.पण आमदारकी त्यांच्या कडे फक्त एकच वर्ष राहिली कारण १९७१ ला कोकणातल्या राजापूर मतदार संघातून खासदार झालेले 'पै' यांचं अकाली निधन झालं आणि ती जागा खाली झाली.राजापूरच्या जागा मधू दंडवतेंनी लढवावी असा आदेश जनता पक्षाने काढला आणि दंडवतेंना आमदारकीचा राजीना देऊन खसदारकीची निवडणूक लढवावी लागली.ती निवडणूक दंडवते मोठ्या फरकाने जिंकले.तेंव्हा पासून दंडवते राजापूर मतदार संघातून सहा वेळेस जिंकून गेले.
१९९१ ला सोविएत रशिया तुटला तेंव्हा आता अध्यक्ष असलेले पुतीन रशियन सुरक्षा विभागात होते. रशियाचे...
पाब्लो एस्कोबार हा काय साधा सुदा गुन्हेगार नाही. अख्या अमेरिकेला याने नशेला लावलं होतं. एकूण...
२३ वर्षाचा होता तेंव्हा आईला म्हणाला ,”आई मी सगळे लोक विकत घेऊ शकतील अशी जनता...
रस्त्यावरून एखादी बुलेट गेली कि आज देखील सगळे लोक तिच्याकडे इच्छा असो कि नसो तरी...
नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी गरोदर सिंधू ताईंना घरातून हाकलून दिले. गावातल्याच एका बैलाच्या गोठ्यात सिंधुताईंनी...