कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं काही बंद असताना IPL मात्र चालू होतं. यावर भारतीय खेळाडूंनी कोणीच काही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आस्ट्रेलिया खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट याने IPL वर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. थेट टीका न करता IPL सामने बरोबर आहेत कि कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे सामने आहेत का ? असा खोचक सवाल गिलख्रिस्ट याने केला आहे. त्याच्या या वक्तव्यावर भारतीय खेळाडूंनी अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंना भारतातील कोरोना परिस्थिती गंभीर दिसत नाही. यावर आपल्या खेळाडूंनी भूमिका घेणे अपेक्षित आहे. गिलख्रिस्टच्या भूमिकेने भारतीय मीडियात चांगलीच चर्चा रंगली. इतर खेळाडूंवर याचा काय परिणाम झाला माहित नाही पण भारतातील परिस्थिती जगभर पोहचली आहे हे दिसून येत आहे.
खेळाडूंनी कोणतीही भूमिका घेतली नसली तरी काही खेळाडू IPL पुढील सामने खेळणार नाही असं बोलले आहेत. क्रिकेटपटू आर. अश्विन ने IPL मधून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. त्याचे कुटुंब कोरोनाशी लढत असल्याने यावेळेस कुटुंबाला आधार देणे गरजेचे आहे असं सांगून यावर्षी IPL खेळणार नसल्याचे त्याने सांगितले. जर परिस्थिती ठीक झाल्यास पुन्हा खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
कोरोनाने सर्वच प्रभावित झालो आहोत. त्याचा परिणाम IPL वर पण होताना दिसतोय. अश्विनच्या निर्णयाने IPL बंद पडणार नसले तरी त्याची उणीव IPL मध्ये जाणवेल. सध्या देशावर भीषण कोरोनाचे सावट आहे. आशा करू कि ही वेळ लवकर निघून जाईल
हे खास आपल्यासाठी
कोविडच्या काळात वरदान ठरलेल्या जम्बो हॉस्पिटलचा उगम ब्रिटिशांच्या काळात झालाय
पुणे शहरासाठी नवी नियमावली जाहीर काय सुरु, काय बंद ? (Pune lockdown guidelines today)
लसीकरण पॅकेज विकणाऱ्या हॉटेल वर कारवाई होणार (Hospital and hotel can not offer vaccination package)